14/03/2026
माणिकगड आणि वाटाड्या
पुरंदरच्या तहातील एक महत्वाचा गड असल्यामुळे हा गड बरीच वर्ष माझ्या यादीत होता. तसेच याचे दुर्गम स्थान आणि चारही बाजूनी घनदाट जंगलांनी वेढलेले असल्यामुळे जास्त गडप्रेमी तिकडे जात नाहीत. शिवस्पर्श संस्था, पुणे यांच्या पुढाकाराने हा गड सर करण्याचे ठरले. फेब्रुवारी महिना असल्यामुळे शनिवारी रात्री 11 वाजता आम्ही 17 गडप्रेमी पनवेल कडे निघालो. दुर्गम गड आणि भरपूर गुरांच्या वाटा असल्यमूळे गावातील वाटाड्याचे नियोजन आधीच झाले होते. तेवढ़्यात अंधारातून एक मानवी सावली काठीचा आधार घेत आमच्या दिशेने येताना दिसली. काटक शरीर, डोक्यावर धनदाट केस, दाढी मिश्या, अंगात पांढरा टी-शर्ट, खाली थ्री-फोर्थ पँट, हातात एक मजबूत काठी, पायात चप्पल नाही. जास्त लक्ष वेधून घेतले ते त्याच्या पायाने. एक पाय जन्मजात अधू असल्याने तो जमीनीवर पोहोचत नसल्याने तो काठीचा आधार घेउनच चालत होता. आमच्या समोर येऊन थांबला. तोच होता आमचा आजचा वाटाड्या काशीनाथ.
आमच्या भुवया उंचावल्या. हे एकताच मनात एकच शंका आली जी आत्ता तुमच्या मनात आली. आम्ही सगळ्यानी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि पहाटे 5:30 ला ट्रेकला सुरवात केली. ब्याटरीच्या प्रकाशात एका रांगेत फक्त पायांचा आणि पाला पाचोल्यांचा आवाजात प्रवास शांतपने चालू होता. तेवढ़्यात जानवले झाडीतून दोन कुत्री आमच्या बरोबर चालत होती. ती जोड शेवट पर्यंत आमच्या बरोबर होती. 7 वाजता आम्ही गड पायथ्याला असलेल्या हनुमान मंदिरापाशी आलो. पहाटेच्या उजेडात आता गड स्पष्ट दिसू लागला. उशीर न करता लगेच गडाला वळसा घालुन खिंडितून वर चढ़न्यास सुरवात केली. 8:30 वाजता आम्ही गडाच्या पड़क्या प्रवेशद्वारावर पोहोचलो. समोर एका बुरुजावर भगवा ध्वज फड़कत होता. शेजारीच चुन्याचा घाना आहे. पूढ़े एक मोठी तटबंदी असुन डाव्या बाजूस गणेश दरवाज़ातुन आपन आत प्रवेश करतो.
कड़क उष्णता, घाम, खडकाळ पायवाटा आणि थकवा सर्व काही मंदावते. कसेबसे हनुमान मंदिरावर पोहोचलो. थोड़ी विश्रांती आणि हनुमानरायाची ऊर्जा घेत परतीचा प्रवास चालू ठेवला. दुपारी 12:30 वाजता आम्ही ठाकुरवाडीत पोहोचलो. महत्त्वाच म्हणजे संपूर्ण प्रवासात काशीनाथने पुढ़े राहुन, एकही वाट न चुकवता, न थकता, ठरलेल्या वेळेत आणि सर्वाच्या पूढ़े राहुन 15 किलोमीटर, 6 तासांची गड भ्रमंती आणि शिवस्पर्श संस्थेचे अचूक नियोजनामूळे पूर्ण झाला.
काशीनाथची जिद्द, आत्मविश्वास आणि कौशल्याच्या जोरावर अपंगत्व हे शरीराला असते, मनाला नाही हे दाखवून दिले. माणिकगड आणि काशीनाथ हे समीकरण मनात घर करुण गेल.
rajgad