14/04/2022
डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालपण – Dr. Babasaheb Ambedkar Early Life In Marathi
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्यप्रदेशमध्ये 14 एप्रिल 1891 मध्ये झाला. आंबेडकर हे त्यांच्या पालकांचे 14 वे अपत्य होते. त्यांचे वडील भारतीय सैन्यात सुभेदार होते आणि त्यांची पोस्टिंग इंदूरजवळील महू येथे होती, जिथे आंबेडकरांचा जन्म झाला. 1894 मध्ये सेवानिवृत्तीनंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब महाराष्ट्रातील सातारा येथे स्थलांतरित झाले. काही दिवसांनंतर त्यांच्या आईचे निधन झाले, त्यानंतर त्यांच्या वडिलांनी दुसरे लग्न केले आणि ते मुंबईला गेले. त्यानंतर आंबेडकरांचे शिक्षण मुंबईत झाले, 1906 मध्ये वयाच्या 15 व्या वर्षी त्यांचा विवाह 9 वर्षांच्या रमाबाईशी झाला. त्यानंतर 1908 मध्ये त्यांनी 12वीची परीक्षा दिली. आंबेडकरांनी लहानपणापासून अस्पृश्यता पाहिली होती,
ते हिंदू महार जातीचे होते, ज्यांना खालच्या दर्जाचे लोक समजले जात होते आणि उच्च जातीचे लोक त्यांना स्पर्श करणे पाप मानत. त्यामुळे आंबेडकरांना समाजात अनेक ठिकाणी भेदभावाला सामोरे जावे लागले. या भेदभावाला आणि अपमानाला बळी पडलेल्या आंबेडकरांना ते ज्या आर्मी स्कूलमध्ये शिकायचे, तिथे त्यांच्या जातीतील मुलांना वर्गात बसू दिले जात नव्हते. शिक्षकांनीही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. इथे त्यांना पाण्याला हातही लावू दिला जात नव्हता, शाळेचा शिपाई त्यांना वरून ओतून पाणी देत असे, ज्या दिवशी शिपाई आला नाही, त्या दिवशी त्यांना पाणी सुद्धा मिळाले नाही. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती)
वाचा – जाणून घ्या बाबासाहेबांचे सुविचार मराठीमध्ये
डॉ. भिमराव आंबेडकरांचा शैक्षणिक प्रवास (Dr. Babasaheb Ambedkar Education )
प्राथमिक आणि उच्च शिक्षणासाठीही बाबासाहेबांना संघर्ष करावा लागला होता. त्या काळी दलित मुलांना शाळेत वर्गात बसण्याची आणि पाणी पिण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे शिक्षणाचा मुलभूत अधिकार मिळवण्यासाठी बाबासाहेबांना अनेक कष्ट घ्यावे लागले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण –
वडील भारतीय सैन्यदलात असूनही आर्मी स्कूल मध्येही त्यांना शैक्षणिक सुविधा मिळाल्या नाहीत. सैन्यदलातील लोकांच्या मुलांना मिळणाऱ्या सवलतींचा त्यांना फायदा झाला. मात्र शाळेत सतत जातिभेदाला सामोरे जावे लागत असे. बाबासाहेबांनी अशा परिस्थितीतही त्याचे प्राथमिक शिक्षण दापोलीत पूर्ण केले. या शाळेत त्यांना वर्गात बसण्याची परवानगी मिळाली नव्हती. पुढे वडिलांसोबत साताऱ्याला गेल्यावर पुढील शिक्षणासाठी बाबासाहेबांनी सातारा हायस्कूल या इंग्रजी सरकारी हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. पुर्वी कोकणातील लोकांमध्ये आडनावे गावावरून ठरत असून त्यापुढे कर लावण्याची पद्धत होती. त्यानुसार त्यांचे नाव आंबवडेकर असे ठेवण्यात आले होत. मात्र उच्चारताना त्रास होत असल्यामुळे पुढे त्याची आंबेडकर अशी नोंद करण्यात आली. साताऱ्यामध्ये चौथीची परीक्षा पास झाल्यावर बाबासाहेब सहपरिवार मुंबईला आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबई विद्यापीठातून पदवीधर –
बाबासाहेब १९१२ साली मुंबईतील एलफिस्टन हायस्कुलमध्ये पदवीधर झाले. बाबासाहेब लहानपणापासूनच हुशार आणि बुद्धीमान होते. त्यामुळे ते प्रत्येक परीक्षेत ते नेहमीच चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत असत. प्राथमिक शिक्षण पूर्ण करून मुंबईत पदवी प्राप्त करणारे बाबासाहेब हे पहिले दलित होते. मुंबई विद्यापीठातून त्यांनी अर्थ शास्त्र आणि राजनिती या विषयांमध्ये पदवी प्राप्त केली होती. संस्कृत शिकण्यास विरोध झाल्याने त्यांनी फारसी भाषेतून शिक्षण घेतलं. आंबेडकर मॅट्रिक पास झाल्यावर त्यांच्या ज्ञातिबांधवांनी त्यांच्या कौतुकाचा एक कार्यक्रम केला होता. कारण त्या काळात एका दलित मुलांने एवढे यश मिळवणे ही एक खूप मोठी गोष्ट होती. त्यावेळी बाबासाहेबांच्या केळुसकर गुरूजींनी त्यांना स्वतः लिहिलेल्या बुद्धचरित्रातची एक प्रत भेट म्हणून दिली. हे पुस्तक वाचल्यानंतर बाबासाहेबांना बुद्धांच्या शिकवणीबद्दल आकर्षण निर्माण झाले. आर्थिक परिस्थितीमुळे बाबासाहेब महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकतील असं त्यांच्या गुरूजींना वाटत नव्हतं. यासाठीच त्यांनी बाबासाहेबांची भेट महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याशी करून दिली. बाबासाहेबांची हुशारी पाहुन महाराजांनी त्यांना शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केले. ज्यामुळे पुढे बाबासाहेब मुंबईतील एलफिस्टन येथे शिक्षण घेऊन पदवीधर झाले. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती)
वाचा – बाबासाहेब आंबेडकर शायरी मराठी मध्ये
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कोलंबिया विद्यापीठातून पीएचडी –
बाबासाहेबांना त्यांच्या बुद्धीमत्तेमुळे बडोदा संस्थानात राज्य सरकारने रक्षामंत्री बनवलं मात्र तिथेही त्यांना सतत जातिभेदाला सामोरे जावे लागत असे. सतत होणाऱ्या अशा अपमानामुळे बाबासाहेब जास्त काळ या पदावर काम करू शकले नाहीत. पुढे त्यांना न्युयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातून उच्चपदवीसाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते अमेरिकेत पुढील शिक्षणासाठी निघून गेले. १९१५ साली बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठातून समाजशास्त्र, इतिहास, दर्शनशास्त्र, मानव विज्ञान आणि अर्थशास्त्रातून एम ए ची पदवी प्राप्त केली. प्राचीन भारताचे वाणिज्य या विषयावर संशोधन केले. अमेरिकेतून १९१६ साली त्यांनी यासाठी पीएच डी मिळवली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची लंडन विद्यापीठातून उच्च शिक्षण –
अमेरिकेतील फेलोशिप संपल्यावर बाबासाहेब पुन्हा भारतात परतले. मात्र येताना ते स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स अॅंड पॉलिटिकल सायन्स यात एम.एस.सी. आणि डी.एस.सी. शिवय बार एट. लॉसाठी नोंदणी करून आले होते. भारतात आल्यावर सर्वात आधी त्यांनी प्रथम शिष्यवृत्तीच्या नियमानुसार बडोदा राजदरबारात सैनिक अधिकारी आणि वित्तीय सल्लागाराची नोकरी केली. राज्याचे रक्षा सचिव हे पद सांभाळले. मात्र जातिभेदामुळे त्यांना नोकरी करताना खूपच त्रास सहन करावा लागत असे. नोकरी करत असूनही शहरात भाड्याने घर मिळाले नाही. या त्रासाला कंटाळून त्यांनी ही नोकरी सोडून खाजगी शिक्षक आणि अकाऊंटटचे काम सुरू केले. सल्लागाराचा व्यवसायही करण्याचा त्यांनी प्रयत्न केला मात्र त्या काळच्या सामाजिक परिस्थितीमुळे तो करता आला नाही. शेवटी ते मुंबईत आले आणि त्यांनी राजनैतिक अर्थशास्त्राचे प्राध्यापक झाले. नोकरी करत असताना ते त्यांच्या पुढील शिक्षणासाठी पैसे जमवत होते. ज्यामुळे पुन्हा १९२० साली ते लंडनला पुढील शिक्षणासाठी गेले. १९२१ साली लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स अॅंड पोलिटिकल सायन्स मधून त्यांनी मास्टर पदवी प्राप्त केली. पुढे डी. एस. सी. ही पदवीदेखील मिळवली. जर्मनी विद्यापीठीतून डी.एस.सी केले. न्यायशास्त्राचा अभ्यास करून ब्रिटिश बारमध्ये बॅरिस्टर चे काम पाहिले. पुढे ८ जुन १९२७ ला कोलंबिया विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वैयक्तिक जीवन – Dr. Babasaheb Ambdkar Personal Life In Marathi
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १९०६ साली रमाबाई यांच्याशी विवाह झाला होता. रमाबाई आणि बाबासाहेबांच्या यशवंत नावाचा मुलगा झाला. मात्र १९३५ साली रमाबाईंचे एका दुर्धर आजाराने निधन झाले. १९४० साली बाबासाहेबांनाही अनेक आजारांनी ग्रासले होते. मुंबईत या आजारांवर उपचार घेत असताना त्यांची ओळख डॉ. शारदा कबीर यांच्यासोबत झाली. सम विचारांमुळे पुढे त्या दोघांनी विवाह केला. डॉ. शारदा यांनी विवाहानंतर स्वतःचे नाव बदलून सविता आंबेडकर असे केले. डॉ. शारदा यांनी आयुष्यभर बाबासाहेबांच्या आरोग्याची काळजी घेतली. समाजात त्यांना माई या नावाने ओळखले जाऊ लागले.
माहिती स्रोत:
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांचे बालपण, शिक्षण, सामाजिक आणि राजकीय प्रवास यासोबतच भारतीय बौद्ध ....