AweSome motivation Ajmvhankade.

AweSome motivation Ajmvhankade. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from AweSome motivation Ajmvhankade., Photography Videography, Solapur.

Permanently closed.
14/08/2022

*राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर*

मुंबई, दि. 14: राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.

त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि *उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

*राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.*

*इतर 18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत:*

*सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील -*
महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभाग

*सुधीर मुनगंटीवार-*
वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय विभाग

*चंद्रकांत पाटील-*
उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य विभाग

*डॉ. विजयकुमार गावित-*
आदिवासी विकास विभाग

*गिरीष महाजन-*
ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण विभाग

*गुलाबराव पाटील-*
पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

*दादा भुसे-*
बंदरे व खनिकर्म विभाग

*संजय राठोड-*
अन्न व औषध प्रशासन विभाग

*सुरेश खाडे-*
कामगार विभाग

*संदीपान भुमरे-*
रोजगार हमी योजना व फलोत्पादन विभाग

*उदय सामंत-*
उद्योग विभाग

*प्रा.तानाजी सावंत-*
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग

*रवींद्र चव्हाण -*
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

*अब्दुल सत्तार-*
कृषी विभाग

*दीपक केसरकर-*
शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग

*अतुल सावे-*
सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण विभाग

*शंभूराज देसाई-*
राज्य उत्पादन शुल्क विभाग

*मंगलप्रभात लोढा-*
पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास विभाग

 #सोलापुरसाठी_अभिमानाची_गोष्ट 💐मूळचे कोकण व शालेय शिक्षण सोलापुरातील हरिभाई शाळेत झालेलेहरिभाई प्रशालेचे माजी विद्यार्थी...
29/07/2022

#सोलापुरसाठी_अभिमानाची_गोष्ट 💐
मूळचे कोकण व शालेय शिक्षण सोलापुरातील हरिभाई शाळेत झालेले
हरिभाई प्रशालेचे माजी विद्यार्थी #श्री #उदयजी_लळीत हे 27 ऑगस्ट रोजी भारताचे सरन्यायाधीश होत आहेत...
ही सोलापूर च्या जनतेसाठी च्या दृष्टीने अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. त्यांचे घर हे आपल्या सुभाष चौकातील बँक ऑफ इंडिया (प्रियांका ज्यूस) शेजारी आजही आहे...
ही सुद्धा आपल्या भागातील जनतेसाठी प्रेरणादायी व मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे...

श्री उदयजी लळीत यांचे अभिनंदन 💐💐💐

21/07/2022

मुसलमान मुलींना अंगभर कपडे पाहीजेत
आणि हिंदु मुलींना अंगभर कपडे नकोत...
आधुनिकतेच्या नावाखाली ९९ टक्के हिंदु मुली वाया जात चालल्यात...आज रोजी कमीत कमी कपडे घालुन फिरत असलेल्या ९९% मुली या हिंदु आहेत... अश्लिलतेमुळे बलात्काराला बळी पडत असलेल्या ९९% मुली हिंदु आहेत... मुसलमान मुलींना त्यांची संस्कृती जपायची आहे पण हिंदु मुलींना पाश्चात्य संस्कृती जवळ करायची आहे.. मी हिजाब आणी बुरख्याच्या विरोधातच आहे शंभर टक्के परंतु हिजाबवरुन पेटलेल्या मुस्लीम मुली बघुन वाईट वाटलं की, हिंदु मुलींना स्वधर्माबाबत कसलीही आपुलकी नाही. परकीय ख्रिश्चनांचे अनुकरण करण्यातच धन्यता मानत असलेल्या हिंदु मुली साडी, पंजाबी ड्रेस घालणं कमी पणाचं समजतात हे दुर्दैवच आहे...
हिंदु मुलींनी सुद्धा धर्मनिष्ठा जपली पाहीजे. आपले संस्कार जपले पाहिजेत. मुसलमान मुलींना बुरखा घालुन फिरायला लाज वाटत नाही पण हिंदु मुलींना कपाळी कुंकु, टिकली लावायला लाज वाटते हे सत्य आहे, दुर्दैव आहे....
कुठतरी चुकतय ते सुधारलं पाहीजे...

*हा बदल नक्की केव्हा झाला?*

वीस पंचवीस वर्षांपूर्वी नोकरी करणारा मुलगा पगार निमूटपणे वडिलांच्या हातात देत होतो.. ! मग वडील त्यातून घरातला काही खर्च करायचे, थोडी बचत केली जायची आणि मुलाला येण्याजाण्याच्या
तिकीटापुरते आणि दिवसाला फार तर एक चहा पिता येईल इतके पैसे दिले जात होते. आता मुलाला पगार किती मिळतो हे विचारायला आई-वडील कचरतात. मुलगा त्या पैशाचे काय करतो हे विचारायची हिम्मत/इच्छा आई-वडिलांकडे नसते. *हा बदल केव्हा झाला....?*

कॉलेजमध्ये जाताना साडी ऐवजी पंजाबी ड्रेस घालायला मिळतो याचा आनंद मानणारी मुलगी आता तिच्या मुलीला हाफ पॅन्टमध्ये फिरताना बघते. मनातल्या मनात चरफडते पण स्पष्टपणे मुलीला अंगभर कपडे घाल असे म्हणायची हिंमत करत नाही....! *हा बदल केव्हा झाला....?*

वयात आलेली मुलगी संध्याकाळच्या आत घरात असायची, घरकामात मदत करायची. आता एकदा स्वयंपाक घरात येऊन खायला काय आहे ते बघते आणि स्वतःच्या खोलीत जाऊन परस्पर ऑर्डर करून खाणं मागवते. *हा बदल केव्हा झाला......?*

लग्नाअगोदर मुला-मुलीने एक-दोन वेळा भेटणे म्हणजे पुढारलेपण मानणारे आता नातवंडांचे लिव इन रिलेशनशिप स्वीकारतात. *हा बदल केव्हा झाला.....?*

वर्षातून एकदा होळीच्या वेळी मोठ्या लोकांपासून लपून भांग पिण्याचा कार्यक्रम ठरवणारी आता प्रौढ झालेली माणसं घरातल्या तरुण मुलापुढे सहज ग्लास भरु लागली. *हा बदल कधी झाला....?*

नातवंडांना जवळ घेणारी, नातीच्या केसांना तेल लावून देणारी, गोष्टी सांगणारी आजी, आता सकाळी योगा क्लास नाहीतर लाफ्टर क्लासला जाते आणि नातवंडांशी टीव्हीच्या रिमोटसाठी भांडते. *हा बदल केव्हा झाला.....?*

घरातल्या कोणाशी बोलत नाहीत अशांना कौन्सिलर जवळचा वाटतो. त्याला पैसे देऊन त्याचा सल्ला मानतात. पण स्वतःच्या भावंडांवर विश्वास ठेवायला तयार नसतात. तोच प्रकार पैशाच्या व्यवहाराबद्दल. नवरा-बायको दोघेही कमावतात. पण कुठे खर्च झाले, किती गुंतवले, कुठे गुंतवले, ते फक्त सीएला माहित असते. मुलीच्या संसारातले सगळे लहानसहान तपशील जाणून घेणारे आई-वडील, मुलगा आणि सुनेच्या बाबतीत मात्र अलिप्त राहतात. *असं का होतंय.....?*

वडीलधा-यांचा मान ठेवणा-यांच्या मुली नवऱ्याचा येता-जाता अपमान करतात, सगळ्यांसमोर उणं-दुणं काढतात. अशा वेळी *मुलीचे आई-वडील कसनुसं हसतात* आणि मुलाचे आई-वडील हतबुद्ध होतात. *हा बदल कधी झाला.......?*

तरुण मुले एक नोकरी सोडतात, दुसरी धरतात. राहत्या गावातून दुसऱ्या गावी जातात. सगळे ठरल्यावर आई-वडिलांना फक्त सांगितलं जातं. त्याच्यापेक्षा कमी महत्त्वाच्या गोष्टींमध्ये तर आई-वडिलांना सांगण्याचीही गरज नसते. मित्रांबरोबर ट्रीपला जाणे, ब्रेकअप होणे, सिनेमाला जाणे, पार्टी करणे, स्वतःसाठी नवीन वस्तू, फोन, कपडे वगैरे खरेदी करणे, अशा गोष्टीत आई-वडिलांनी दखल दिलेली मुलांना आवडतं नाही. असं का होतं..? *हा बदल कधी झाला.......?*

नातेवाईकांकडे जाणं, शेजार्‍यांकडे वेळप्रसंगी जाणं, लग्न समारंभात सहभागी होणं, कुळाचार पाळणे, देवळात जाणे, पूजा करणे, इत्यादी गोष्टींवर आता काही घरात नाराजी नाही तर भांडणे होतात. असं का होतं...? *हा बदल कधी झाला.......?*

मान्य आहे, दोन पिढ्यांमध्ये अंतर असतेच. पाचवारी नेसणाऱ्या सुनेबद्दल नऊवारी नेसणाऱ्या सासूने तेव्हाही नाराजी व्यक्त केली होती. पण आता पन्नाशी पार केलेल्या पिढीत आणि त्यांच्या मुलांच्या पिढीत अंतर नाही दरी निर्माण झाली असं वाटतं. *हा बदल नक्की केव्हा झाला......?*

खरंच विचार करायला हवा. समाज प्रगतीकडे नव्हे तर अधोगतीकडे चालल्याचे हे भयंकर वास्तव आहे. आणि ते सहजासहजी पचनी पडणारेही नाही हे मोठे _*दुर्दैव*_ आहे.

🍁🌹🍃🍁🪷🍁🍃🌹🍁

14/07/2022

उजनी धरण पाणी पातळी

दि :14/07/22
संध्या : 06.00 वा.

पाणी पातळी : 492.340
एकूण साठा : 2077.91
उपयुक्त साठा : 275.10
टक्केवारी : 18.13%

बंडगार्डन विसर्ग : 18,970
दौंड विसर्ग : 64,716

कालवा :
बोगदा :
नदी :
वीज निर्मिती :
पाऊस : मी. मी.
एकुण पाऊस : 265 मी. मी.

28/06/2022
22/06/2022

🥏भाजपकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची घोषणा.

21/06/2022
📣 ब्रेकिंग! दहावीचा ऑनलाइन निकाल उद्या होणार जाहीर👇 खालील लिंकवर पाहता येईल निकाल
16/06/2022

📣 ब्रेकिंग! दहावीचा ऑनलाइन निकाल उद्या होणार जाहीर

👇 खालील लिंकवर पाहता येईल निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालाबाबत शिक.....

08/06/2022

⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕

HSC Result : निकाल काहीही येवो, निराश होऊ नका; 'हे' दिग्गजही परीक्षेत नापास पण जीवनात मात्र टॉपर
-------------------------------
Maharashtra HSC Result : गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतिक्षीत असलेला महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (HSC Exam Result News) जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडं राज्याचं लक्ष होतं. निकालानंतर काही जण निराश होतात. त्यातून टोकाची पावलं उचलली जातात. मात्र हा निकाल आपलं संपूर्ण आयुष्य होत नाही. अपयश आलं म्हणून खचून न जाता पुन्हा प्रयत्न करुन आणि वेगळे प्रयोग करुन जीवनाच्या परीक्षेत टॉपवर असतात.

दहावी बारावीत नापास झाल्यानंतरही आज लाखो लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या काही उदाहरणांवरुन आपण ही गोष्ट लक्षात घेऊ शकतं. मराठमोळे दिग्दर्शक, लेखक, कवी नागराज मंजुळे यांचं नाव यात मुख्यत: येतं. मंजुळे यांनी स्वत: फेसबुक पोस्ट करत यावर भाष्य केलं होतं. मंजुळेंनी पोस्टमध्ये म्हटलं होतं की, मी दहावीत दोनदा नापास झालो होतो. पहिल्या प्रयत्नात पास झालो असतो तर पुढच्या वर्गात गेलो असतो फार तर. मात्र नापास झालो म्हणून फार काही बिघडलं होतं असं मला वाटत नाही. दहावी, बारावी, एम. पी. एस. सी. , यु. पी. एस. सी.… परीक्षा कुठलीही असो. ती अंतिम कधीच नसते. यशापयशात… असल्या-नसल्यात आनंदानं जगत राहण्यापेक्षा दुसरं कुठलंही मोठं यश नाही, असं मंजुळे यांनी म्हटलं होतं.

सैराट, फँड्री, न्यूड, अंधाधूंद, झुंड, गंगुबाई काठियावाड, रेडू यासह अनेक सिनेमात अभिनय केलेली अभिनेत्री म्हणजे छाया कदम. छाया कदम म्हणजे आपल्या सक्षम अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात घर करणारं एक नाव. मात्र ती देखील 12वीच्या परीक्षेत नापास झाली होती. खेळाची आवड त्यातही कबड्डीमध्ये राज्यपातळीवर मैदान गाजवणाऱ्या छाया कदम यांना देखील 12वीत अपयशाला सामोर जावं लागलं होतं. पण या अपयशानं त्या कधीही खचून गेल्या नाहीत. तर त्यावर मात करत आयुष्यात पुन्हा नव्यानं काही तरी करण्यास सज्ज झाल्या. अभिनेत्री छाया कदम यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन याबाबतची माहिती दिली आहे. 12वीत नापास झाले म्हणून मी कधी टोकाचं पाऊल उचललं नाही. असं म्हणत त्यांनी आपला अनुभव शेअर केला आहे.

छाया कदम यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं की, मी बारावीत नापास झाले होते. पण अपयशाने खचली नाही. मला कबड्डी खेळायला लै आवडायचे. वेडीच होते कबड्डीची. त्यामुळे अभ्यास कमी आणि खेळच जास्त. त्यातच अभ्यासाचा 'खेळ' व्हायचा. स्टेट लेवल पर्यंत कबड्डी खेळले. तिथेही आयुष्याचे काही झाले नाही. मात्र अनुभव खूप आले.आज माझ करियर वेगळ्याच क्षेत्रात धावतय. आयुष्य जगायला मजा येतेय हे मात्र नक्की. सांगायचं तात्पर्य एवढच की, अभ्यास, मार्क हे सर्वस्व नाही मित्रांनो, याचा अर्थ अभ्यास करू नये अस नाही. पण मार्क कमी मिळाले म्हणून हिरमसून जाऊन टोकाचे निर्णय घेऊ नका एवढेच सांगायचे आहे. वेगवेगळी क्षेत्र आपली वाट बघत आहेत.

नागराज मंजुळे किंवा छाया कदम ही केवळ दोनच अशी नावं नाहीत जी परीक्षेत नापास झाल्यानंतर आज आपलं एक वेगळं विश्व तयार केलंय. अशी कैक नावं आहेत. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो जरी तुम्हाला या परीक्षेत अपयश आलं तरी खचून जाऊ नका.

05/06/2022

*सुप्रभात ठळक घडामोडी*

रविवार, दि.५ मे २०२२
___________________________
🌀अहमदनगर : माझी वसुंधरा अभियान २ अंतर्गत अहमदनगर महापालिकेचा राज्यात प्रथम क्रमांक

🌀लातूर - दीड लाख रुपयांची लाच घेताना तहसीलदारासह अन्य एक जण जाळ्यात

🌀उत्तर प्रदेशच्या हापुडमध्ये केमिकल कारखान्याच्या बॉयलरचा स्फोट! १२ जणांचा मृत्यू, १९ पेक्षा अधिक जखमी

🌀 ठाणे - उल्हासनगरात ८ वर्षाच्या मुलीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू; ट्रक चालकाला अटक, गुन्हा दाखल

🌀नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज वाराणसी दौऱ्यावर, काशी विश्वनाथ मंदिरात करणार पूजा

🌀माजी मंत्री, ज्येष्ठ कामगार नेते हरिभाऊ नाईक यांचे निधन; वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

_____________________ श्रध्दा सबुरी फास्ट न्यूज

Address

Solapur
413008

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when AweSome motivation Ajmvhankade. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share